१५ ऑगस्ट सोमवार, म्हणजे जोडून सुट्ट्या आणि आमच्या सारख्या भटक्यांसाठी पर्वणी. पण नेमकी शनिवारी राखीपौर्णिमा आल्याने अखिल डोंगरयात्रा भगिनी मंडळामधल्या समस्त भगिनींनी वाडेश्वर मधे बैठा सत्याग्रह (मी त्याला खाद्याग्रह म्हणीन) मांडला. आणि जीवधन किल्ल्याला फाटा देऊन तीन दिवसांची मोहीम २ दिवसांवर आणली. या दोन दिवसात आम्ही दहा टाळकी कुकडनेरात (कुकडी नदीच्या खोर्यात) यथेच्छ भटकणार होतो. मी, श्रीकांत, शितल, प्राजक्ता, वृंदा, सतिश, प्रियांका, राहूल, गौरव आणि मयूर असा फौजफाटा जमा झाला होता.
शनिवारी पहाटे ५.३० ला साखर झोपेत लवंडलेलं पुणं सोडलं आणि नाशिक हमरस्त्याला लागलो. नारायणगावहून जुन्नरकडे जाणारा फाटा घेतला. शिवजन्मभूमी जुन्नरमधे शिरताच शिवनेरीचं रांगडं रुप डोळ्यात भरलं. माथ्यावर ढगांची दाटी जमली होती. त्या पावन भूमीवर सडे शिंपण्याची जणू काही स्पर्धा लागली होती. आमच्या आजच्या वेळापत्रकात चावंड आणि कुकडेश्वर होते. वेळ न दवडता आम्ही गाड्या चावंडवाडीच्या दिशेने हाकल्या. चालत गेलो असतो ( किंबहुना रस्त्यावरचे खड्डे आणि त्यातलं पाणी यामुळे पोहोत गेलो असतो असेही म्हणू शकतो) तर लवकर पोहोचलो असतो, इतका खराब रस्ता होता. जागोजागी खड्डे आणि त्यात भरलेलं पावसाचं गढूळ पाणी त्यामूळे अंदाज साफ चुकत होते. माझ्या गाडीला जर मनुष्यवाणी येत असती तर असल्या खराब रस्त्यावर आणल्याबद्दल तिने माझ्या सकट माझ्या खानदानाचाही उध्दार केला असता. चावंडवाडीत पोहोचलो तेव्हा ९.०० वाजले होते. चावंडचे नामकरण श्री शिवाजी महाराजांनी "प्रसन्नगड" असे केले होते.
"तासिले कडे अभेद्य,
घडविले दुर्ग बेलाग...
सळसळती मनगटे मराठी,
अन् समशेर ओकते आग ..."
आश्रमशाळेजवळ गाड्या लावून आम्ही निघालो. पावसाची रिमझिम चालूच होती. आश्रमशाळेच्या मागूनच एक वाट चावंडवाडीहून येणार्या वाटेस जाऊन मिळते. पहिला सोप्पा टप्पा २० मिनिटात संपवून आम्ही चावंडच्या कड्यानजिक येऊन ठेपलो. इथून पुढे खरा कस लागणार होता. सरळसोट कडा तासून केलेल्या पायर्या, त्यावर वहाणारं पाणी, पायर्यांवर वाढलेलं शेवाळं आणि आधारासाठी कोण्या निसर्गवेड्या फॉरेस्ट ऑफिसरने लावलेल्या शिड्या या सगळ्यांच्या बेमालूम मिश्रणातून एक आव्हानात्मक वाट वर चढत होती. शक्यतोवर शिडीचा आधार घेऊ नका, उजव्या हाताने कड्यातील बेचक्यांना घट्ट पकड घ्या, पुढच्या पायाला घट्ट पकड मिळाल्यावरच दुसरा पाय पुढे टाका ... अश्या अनेक सुचना मी गोटातल्या सगळ्यांना दिल्या आणि एकेकाने वर जाण्यास सुरुवात केली. चावंडच्या त्या पायर्या एक वेगळंच थ्रिल देऊन गेल्या.
वाटेत आधारासाठी एक जंबुरा (छोटेखानी तोफ) पुरली आहे, हे पाहून हळहळ वाटली. किल्ल्यांवरील तोफांची मोजणी आणि संवर्धनासाठी काम करणारा माझा मित्र आणि इतिहास तज्ञ सचिन जोशी याच्या मनाची तळमळ आठवली.
शेवटच्या टप्प्यातील पायर्या आधीच्या तुलनेत जरा प्रशस्त आणि दिड दोन फूट उंचीच्या आहेत. चावंड आणि हडसर किल्ल्यांचे दरवाजे प्राचीन काळातील प्रगत दुर्गबांधणी तंत्राची साक्ष देत आजही उभे आहेत. अखंड पाषाणात कोरलेल्या या दरवाजांकडे पाहताना एक वेगळीच अनुभूती येते.
तासाभरात गड फिरून मनाजोगती छायाचित्रे घेतली आणि परतीच्या वाटेकडे लागलो.
आश्रमशाळेसमोरील हापश्यावर चिखलाने माखलेले हातपाय धुवून घेतले. प्रियांका आणि शितलने आश्रमातल्या मुलींना मेहंदी काढायला घेतली आणि मी शाळामास्तरांशी गप्पा मारायला सटकलो. या आश्रमशाळेतील मुलींची संख्या लक्षणीय आहे. तिथेच त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्थाही आहे.
मी बरोबर आणलेल्या औषधांच्या संचातील एक संच शाळामास्तरांकडे दिला आणि आम्ही चावंडवाडीचा निरोप घेतला. दरवेळी ट्रेकला जाताना मी प्रार्थमिक औषधांचे ३-४ संच सोबत घेऊन जातो. ज्या गावात दवाखाना नसेल किंवा गावापासून बराच लांब असेल अशा गावांतील शाळामास्तरांकडे किंवा सरपंचाकडे हे संच देऊन ठेवतो. यावेळेस माझ्यासोबत वृंदानेही एक संच आणला होता, जो आम्ही घाटघर मधे दिला.
आमचं पुढलं लक्ष होतं पूर गावचा कुकडेश्वर !! अदमासे २५०० वर्षांपूर्वीचे पाषाणात घडवलेले शिवमंदीर आणि कुकडी नदीचं हे उगमस्थान जिच्या पाण्यावर माणिकडोह धरण बांधलं आहे. मध्यंतरी पुरातत्व खात्याने पूर्वीचे पडझड झालेले मंदीर उतरवून पुन्हा त्याची नव्याने उभारणी केली आहे.
अजूनही मंदीराच्या पूर्वीच्या बांधकामातील काही शिलाखंड कचर्यात पडले आहेत. छपरावर ढीगभर सिमेंट ओतून त्यांनी संवर्धन केले आहे ? की मंदीर कुरूप करण्यास हातभार लावला आहे ? हा वादाचा मुद्दा आहे. दुपारचे जेवण उरकताना आजच्या वेळापत्रकात नाणेघाटाचा समावेश करण्याचा ठराव एकमताने पास झाला. गाड्या घाटघरच्या दिशेने हाकल्या.
रस्त्याची अवस्था फारच बिकट होती. घाटघर गावातील हनुमान मंदीरात मुक्काम करण्याचं आधीच ठरलं होतं पण दुर्दैव ! मंदीरात वेडावाकडा पाऊस आणि धुकं यामुळे पाणी साठलं होतं. शाळेची किल्ली शोधायला बाळू आसवलेचं घर गाठलं. त्यांच्याकडे पण किल्ली नव्हती पण त्यांनी अतिथी देवो भवः या वचनाला जागून आम्हाला त्यांच्याच घरात रहाण्यासाठी जागा दिली. मुक्कामाची सोय झाली होती. मधला वेळ सत्कारणी लावून प्राजक्ता आणि वृंदा (या दोघींना चहाचं भारी व्यसन आहे) यांनी गावात एका घरात आम्हाला चहा मिळेल याची व्यवस्था केली होती. चहा पिऊन आम्ही नाणेघाटच्या दिशेने निघालो.
घाटावर तूफान वारा होता आणि पाऊस तर अक्षरशा: फटके मारत होता. नाणेघाटाच्या पोटात गुहा आहेत त्यात ५० एक माणसे सहज राहू शकतील. सातवाहनांच्या काळात नाणेघाट हा कोकणातून देशावर येणारा व्यापारी मार्ग होता. कल्याण, नालासोपारा या बंदरातून माल प्रतिष्ठान ( आताचे पैठण ) या सातवाहनांच्या राजधानीकडे नेला जायचा. नाणेघाटावर या मालावर जकात आकारली जायची. सातवाहन साम्राज्ञी नागनिका हिने नाणेघाटात गुहा खोदल्याची नोंद इतिहासात आहे. गुहेतील भिंतीवर आकडेमोड सदृश्य शिलालेखही आहेत. घाटाच्या तोंडावरच एक दगडी रांजण असून त्यात जकात गोळा केली जात होती अशीही माहीती वाचनात आहे. नाणेघाटच्या वर एक अंगठ्यासारखा सुळका आहे ज्याचे "नानाचा अंगठा" असे नाव प्रचलित आहे. याच घाटरस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी चावंड, हडसर, निमगिरी यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली. ऐतिहासिक महत्व असलेल्या या नाणेघाटची मात्र आपल्याच लोकांकडून उपेक्षा होत आहे. आम्ही नाणेघाटात शिरताच पहिले दृश्य गुहेत कोंडाळं करून दारू पिणार्या काही स्थानिक मंडळींच होतं. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ हाच त्यांच्यात संभाषणाचा मुख्य मुद्दा असावा. त्यांची ती मुक्ताफळे जर का राणी नागनिकेने ऐकली असती तर कदाचीत तिने त्या करंट्यांना नानाच्या अंगठ्यावरून कडेलोटाची शिक्षा केली असती. आम्ही तिथे थोडे फोटो काढून काढता पाय घेतला.
रात्री जेवणासाठी मी नुडल्सचं सूप आणि मुगाची डाळीची खिचडी केली होती. मधल्या वेळेत प्राजक्ताने बाळूच्या लहान लहान मुलींच्या हातावर मेहंदी काढून दिली.
दुसर्या दिवशी सकाळी गावात प्रभातफेरी आणि झेंडावंदनाचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही लगेच निद्राधीन झालो.
सकाळी शाळेतील मुलांची प्रभातफेरी पाहून मन एकदम प्रसन्न झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, गावातील सर्व जेष्ठ मंडळी, सरपंच, आम्ही पर्यटक आणि सह्याद्रिचे अनादीअनंत धीरगंभीर कातळकडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सोनेरी सूर्यकिरणं गावावर डोकावत होती, पावसाच्या हलक्या सरीही कोसळत होत्या.
श्रावणातल्या या भारलेल्या वातावरणात राष्ट्रगीत सुरू झाले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या कुशीत स्वातंत्र्य दिन साजरा करायच्या माझ्या परंपरेला मी जागलो होतो. डौलाने फडकणार्या तिरंग्यासमोर मनोमन नतमस्तक झालो. थोडे फोटो काढून आम्ही सामानाची बांधाबांध सुरू केली. आजचं लक्ष होतं हडसर !!
गडावर जाण्यासाठी अजून दोन मार्ग आहेत. एक गावकर्यांनी कातळात खुंट्या ठोकून केलेला मार्ग आणि दुसरा तटबंदीकडून चढून जाणारा मार्ग. राजमार्गाने जाण्याचे दोन फायदे आहेत. वाटेत पिण्याच्या पाण्याचे एक भुयारी टाके लागते आणि डोंगराच्या नळीतून बांधून काढलेल्या १००-१५० पायर्या पहायला मि़ळतात. अगदी पायर्यांपर्यंत गेल्या शिवाय त्या ठिकाणी अशी काहि पायर्यांची वाट आहे हे लक्षात येत नाही. वाट अगदी सोपी आहे.
पायर्या संपल्यावर बोगदेवजा पायर्या असलेले हडसरचे दोन कातळात खोदलेले दरवाजे लागतात. दरवाज्यात पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. हडसरच्या दरवाज्यावर असलेल्या खोदिव पायर्या म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अतिउच्च नमूना आहे. या पायर्यांतून पावसाचे पाणी जाण्यास पन्हाळी सुद्धा खोदलेली आढळतात. गडावर पाण्याची मुबलक टाकी आहेत. शंकराच्या मंदीरात ५-६ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. मंदीरात कोनाड्यांत गणपती बाप्पा, हनुमान आणि गरूडाच्या मुर्ती आहेत. मंदीराच्या अलिकडे मोठ्ठा तलाव आहे. तटबंदीलगत जमीनीत खोदलेल्या धान्याच्या ३ कोठ्या आहेत. पण त्या रहाण्यायोग्य नक्कीच नाहीत.
तास दिडतास गड हिंडून गावाची वाट धरली. गावात आल्यावर रस्त्यालगतच्या ओढ्यावर १५-२० मिनिटे चिखलाने बरबटलेले हात पाय आणि बूट धुण्याचा सामुहीक कार्यक्रम झाला.
गेल्या दोन दिवस सह्याद्रीत घालवून परत शहराची वाट धरणं जीवावर आलं होतं. माहेराहून सासर कडे निघालेल्या एखाद्या माहेरवाशिणीच्या मनाची जी अवस्था होते तशी काहीशी अवस्था माझ्या मनाची झाली होती. पावलं निघत नव्हती पण कसेबसे मी स्वता:ला गाडीत कोंबले. या भटकंतीच्या बर्याचशा आठवणी मनात आणि काहीशा कॅमेर्यात साठवून परतीची वाट धरली.
शनिवारी पहाटे ५.३० ला साखर झोपेत लवंडलेलं पुणं सोडलं आणि नाशिक हमरस्त्याला लागलो. नारायणगावहून जुन्नरकडे जाणारा फाटा घेतला. शिवजन्मभूमी जुन्नरमधे शिरताच शिवनेरीचं रांगडं रुप डोळ्यात भरलं. माथ्यावर ढगांची दाटी जमली होती. त्या पावन भूमीवर सडे शिंपण्याची जणू काही स्पर्धा लागली होती. आमच्या आजच्या वेळापत्रकात चावंड आणि कुकडेश्वर होते. वेळ न दवडता आम्ही गाड्या चावंडवाडीच्या दिशेने हाकल्या. चालत गेलो असतो ( किंबहुना रस्त्यावरचे खड्डे आणि त्यातलं पाणी यामुळे पोहोत गेलो असतो असेही म्हणू शकतो) तर लवकर पोहोचलो असतो, इतका खराब रस्ता होता. जागोजागी खड्डे आणि त्यात भरलेलं पावसाचं गढूळ पाणी त्यामूळे अंदाज साफ चुकत होते. माझ्या गाडीला जर मनुष्यवाणी येत असती तर असल्या खराब रस्त्यावर आणल्याबद्दल तिने माझ्या सकट माझ्या खानदानाचाही उध्दार केला असता. चावंडवाडीत पोहोचलो तेव्हा ९.०० वाजले होते. चावंडचे नामकरण श्री शिवाजी महाराजांनी "प्रसन्नगड" असे केले होते.
चावंड उर्फ प्रसन्नगड
चहूबाजूंना सरळसोट कातळकडे असलेला हा बेलाग दुर्ग म्हणजे जुन्नरच्या शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या दुर्ग चौकडीतील एक अनोखं रत्न आहे. अंदाजे ८० अंशातला हा उभा कडा खोदून त्यात पायर्या घडवल्या आहेत. चावंडच्या कड्यांकडे पहाताना माझ्याच एका कवितेतलं कडवं मनात रेंगाळत होतं."तासिले कडे अभेद्य,
घडविले दुर्ग बेलाग...
सळसळती मनगटे मराठी,
अन् समशेर ओकते आग ..."
आश्रमशाळेजवळ गाड्या लावून आम्ही निघालो. पावसाची रिमझिम चालूच होती. आश्रमशाळेच्या मागूनच एक वाट चावंडवाडीहून येणार्या वाटेस जाऊन मिळते. पहिला सोप्पा टप्पा २० मिनिटात संपवून आम्ही चावंडच्या कड्यानजिक येऊन ठेपलो. इथून पुढे खरा कस लागणार होता. सरळसोट कडा तासून केलेल्या पायर्या, त्यावर वहाणारं पाणी, पायर्यांवर वाढलेलं शेवाळं आणि आधारासाठी कोण्या निसर्गवेड्या फॉरेस्ट ऑफिसरने लावलेल्या शिड्या या सगळ्यांच्या बेमालूम मिश्रणातून एक आव्हानात्मक वाट वर चढत होती. शक्यतोवर शिडीचा आधार घेऊ नका, उजव्या हाताने कड्यातील बेचक्यांना घट्ट पकड घ्या, पुढच्या पायाला घट्ट पकड मिळाल्यावरच दुसरा पाय पुढे टाका ... अश्या अनेक सुचना मी गोटातल्या सगळ्यांना दिल्या आणि एकेकाने वर जाण्यास सुरुवात केली. चावंडच्या त्या पायर्या एक वेगळंच थ्रिल देऊन गेल्या.
चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्या
चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्या
चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्या
चावंडच्या कड्यात कोरलेल्या पायर्या
वाटेत आधारासाठी पुरलेली तोफ
चावंडचा दरवाजा आणि पायर्या
चावंडचा दरवाजा आणि पायर्या
चावंडचा दरवाजा आणि पायर्या
तासाभरात गड फिरून मनाजोगती छायाचित्रे घेतली आणि परतीच्या वाटेकडे लागलो.
वाटेवरून दिसणारी महादेव कोळ्यांची वस्ती चावंडवाडी आणि माणिकडोह धरणाचा विस्तृत जलाशय
माणिकडोह धरणाचा विस्तृत जलाशय
नाजूकतेची वरकडी आहे !!
रे फुलांची रोख किंमत करु नये कोणी ...
फुलले रे क्षण माझे .... फुलले रे !!
मधेच हा भेटला !!
तटबंदीवरून दिसणारं कुकडीचं खोरं आणि समोरचा शंभू डोंगर
चावंडवर माजलेलं गवत मागे शंभू डोंगर
चावंडच्या बालेकिल्ल्यावरील चामुंडा मातेचं मंदीर (किल्ल्यावरील सर्वोच्च जागा)
हरिश्चंद्र गडावरील कुंड आणि रतनवाडीतील कुंडाशी साम्यर्ध असलेलं चावंडवरील कुंड
कुंडाशेजारील मोडकळीस आलेली कमान
अवशेष
झाडोर्यात लपलेली पिंड
चावंडवरील सप्त मातृकांची टाकी (सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत)
वाटेवर पडलेले दगडी उखळ
चावंड उतरताना दिसणारी दरी आणि चावंडवाडी (फिश आय फिल्टरची करामत)
मेहंदी कार्यक्रम
मेहंदी कार्यक्रम
कुतुहल आणि निरागसता !!
आमचं पुढलं लक्ष होतं पूर गावचा कुकडेश्वर !! अदमासे २५०० वर्षांपूर्वीचे पाषाणात घडवलेले शिवमंदीर आणि कुकडी नदीचं हे उगमस्थान जिच्या पाण्यावर माणिकडोह धरण बांधलं आहे. मध्यंतरी पुरातत्व खात्याने पूर्वीचे पडझड झालेले मंदीर उतरवून पुन्हा त्याची नव्याने उभारणी केली आहे.
कुकडेश्वर मंदीर जीर्णोद्धारानंतर
कुकडेश्वर मंदीरावरील मुर्तीकाम
कुकडेश्वर मंदीरावरील नक्षीकाम
कुकडेश्वर
कुकडेश्वर मंदीरावरील नक्षीकाम
कुकडेश्वर मंदीरावरील मुर्तीकाम
कुकडेश्वर मंदीरावरील मुर्तीकाम
हरिश्चंद्रगडावरील मंदिराशी साम्यर्ध असणारं नक्षीकाम
पुजारीबाबा ( बम् बम् भोले !!! )
अजूनही मंदीराच्या पूर्वीच्या बांधकामातील काही शिलाखंड कचर्यात पडले आहेत. छपरावर ढीगभर सिमेंट ओतून त्यांनी संवर्धन केले आहे ? की मंदीर कुरूप करण्यास हातभार लावला आहे ? हा वादाचा मुद्दा आहे. दुपारचे जेवण उरकताना आजच्या वेळापत्रकात नाणेघाटाचा समावेश करण्याचा ठराव एकमताने पास झाला. गाड्या घाटघरच्या दिशेने हाकल्या.
रस्त्याची अवस्था फारच बिकट होती. घाटघर गावातील हनुमान मंदीरात मुक्काम करण्याचं आधीच ठरलं होतं पण दुर्दैव ! मंदीरात वेडावाकडा पाऊस आणि धुकं यामुळे पाणी साठलं होतं. शाळेची किल्ली शोधायला बाळू आसवलेचं घर गाठलं. त्यांच्याकडे पण किल्ली नव्हती पण त्यांनी अतिथी देवो भवः या वचनाला जागून आम्हाला त्यांच्याच घरात रहाण्यासाठी जागा दिली. मुक्कामाची सोय झाली होती. मधला वेळ सत्कारणी लावून प्राजक्ता आणि वृंदा (या दोघींना चहाचं भारी व्यसन आहे) यांनी गावात एका घरात आम्हाला चहा मिळेल याची व्यवस्था केली होती. चहा पिऊन आम्ही नाणेघाटच्या दिशेने निघालो.
घाटावर तूफान वारा होता आणि पाऊस तर अक्षरशा: फटके मारत होता. नाणेघाटाच्या पोटात गुहा आहेत त्यात ५० एक माणसे सहज राहू शकतील. सातवाहनांच्या काळात नाणेघाट हा कोकणातून देशावर येणारा व्यापारी मार्ग होता. कल्याण, नालासोपारा या बंदरातून माल प्रतिष्ठान ( आताचे पैठण ) या सातवाहनांच्या राजधानीकडे नेला जायचा. नाणेघाटावर या मालावर जकात आकारली जायची. सातवाहन साम्राज्ञी नागनिका हिने नाणेघाटात गुहा खोदल्याची नोंद इतिहासात आहे. गुहेतील भिंतीवर आकडेमोड सदृश्य शिलालेखही आहेत. घाटाच्या तोंडावरच एक दगडी रांजण असून त्यात जकात गोळा केली जात होती अशीही माहीती वाचनात आहे. नाणेघाटच्या वर एक अंगठ्यासारखा सुळका आहे ज्याचे "नानाचा अंगठा" असे नाव प्रचलित आहे. याच घाटरस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी चावंड, हडसर, निमगिरी यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली. ऐतिहासिक महत्व असलेल्या या नाणेघाटची मात्र आपल्याच लोकांकडून उपेक्षा होत आहे. आम्ही नाणेघाटात शिरताच पहिले दृश्य गुहेत कोंडाळं करून दारू पिणार्या काही स्थानिक मंडळींच होतं. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ हाच त्यांच्यात संभाषणाचा मुख्य मुद्दा असावा. त्यांची ती मुक्ताफळे जर का राणी नागनिकेने ऐकली असती तर कदाचीत तिने त्या करंट्यांना नानाच्या अंगठ्यावरून कडेलोटाची शिक्षा केली असती. आम्ही तिथे थोडे फोटो काढून काढता पाय घेतला.
नाणेघाटातून दिसणारं तळकोकण
गुहा आणि बाजूला पाण्याची टाकी
ब्राम्ही भाषेतील शिलालेख
चिंबाळलेला नाणेघाट
जकात गोळा करण्याचा दगडी रांजण
माझी लाडली :)
रात्री जेवणासाठी मी नुडल्सचं सूप आणि मुगाची डाळीची खिचडी केली होती. मधल्या वेळेत प्राजक्ताने बाळूच्या लहान लहान मुलींच्या हातावर मेहंदी काढून दिली.
मुगाच्या डाळीची खिचडी बनवताना मी आणि प्राजक्ता
खिचडीचा मंद सुवास दरवळू लागला होता ...
बाळूच्या लहानग्यांच्या हातावर मेहंदी काढताना प्राज.
( वरील तीनही फोटो वृंदाच्या सौजन्याने )
सकाळी शाळेतील मुलांची प्रभातफेरी पाहून मन एकदम प्रसन्न झाले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, गावातील सर्व जेष्ठ मंडळी, सरपंच, आम्ही पर्यटक आणि सह्याद्रिचे अनादीअनंत धीरगंभीर कातळकडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सोनेरी सूर्यकिरणं गावावर डोकावत होती, पावसाच्या हलक्या सरीही कोसळत होत्या.
ढगांची दुलई पांघरलेला घाटघरचा कुलपुरूष जीवधन
वंदे !!! मातरम !! जय जवान !! जय किसान !!!
भालतमाता की !!!! जय !!!! चे बोबडे बोल !!
ध्वजारोहण सोहळा
श्रावणातल्या या भारलेल्या वातावरणात राष्ट्रगीत सुरू झाले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या कुशीत स्वातंत्र्य दिन साजरा करायच्या माझ्या परंपरेला मी जागलो होतो. डौलाने फडकणार्या तिरंग्यासमोर मनोमन नतमस्तक झालो. थोडे फोटो काढून आम्ही सामानाची बांधाबांध सुरू केली. आजचं लक्ष होतं हडसर !!
विजयी विश्व तिरंगा प्यारा ... झंडा उंचा रहे हमारा !!!
नतमस्तक आम्ही येथे !!
हडसर गावात गाड्या लावून आम्ही हडसरवर जाण्याचा राजमार्ग स्विकारला. पहिल्या पठारावर येताच समोर पसरलेल्या या गडाचं दुसरं नाव पर्वतगड का असावं याची प्रचिती येते. पसरलेला हडसर उर्फ पर्वतगड
पठाराहून दिसणारं निसर्गचित्र
हडसरला वळसा मारताना एका वेगळ्या कोनातून दिसणारा कातळकडा
लपाछपी खेळत होता बेटा !! पण आम्ही त्याला पकडला !!
कड्यात खोदलेलं नितळ पाण्याचं टाकं
याच नळीतून हडसरच्या पायर्या आहेत
नळीच्या तोंडाशी डावीकडून प्रियांका, गौरव, सतिश, मी, मयूर, वृंदा, प्राजक्ता, श्रीकांत आणि शितल.
नळीतील पायर्यांची वाट
पायर्या संपल्यावर बोगदेवजा पायर्या असलेले हडसरचे दोन कातळात खोदलेले दरवाजे लागतात. दरवाज्यात पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. हडसरच्या दरवाज्यावर असलेल्या खोदिव पायर्या म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अतिउच्च नमूना आहे. या पायर्यांतून पावसाचे पाणी जाण्यास पन्हाळी सुद्धा खोदलेली आढळतात. गडावर पाण्याची मुबलक टाकी आहेत. शंकराच्या मंदीरात ५-६ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. मंदीरात कोनाड्यांत गणपती बाप्पा, हनुमान आणि गरूडाच्या मुर्ती आहेत. मंदीराच्या अलिकडे मोठ्ठा तलाव आहे. तटबंदीलगत जमीनीत खोदलेल्या धान्याच्या ३ कोठ्या आहेत. पण त्या रहाण्यायोग्य नक्कीच नाहीत.
अखंड कातळात खोदलेला हडसरचा दरवाजा
अखंड कातळात खोदलेला हडसरचा दरवाजा
स्वर्गाचे दार हेच काय हो ??
हडसरचा प्रसिध्द खोदिव पायर्यांचा जिना
दगडी पायर्यात खोदलेली पन्हाळी
शिवमंदीराकडे जाणारी पायवाट
हडसरवरील रमणीय शिवमंदीर
शिवमंदीरातील गणेश मुर्ती
शिवमंदीरातील हनुमान मुर्ती
शिवमंदीरातील गरूड मुर्ती
हडसर वरील शिवपिंड
गडाच्या उगवतीकडे असणारी गुहा
गडाच्या उगवतीकडे असणारी गुहा
गडाच्या उगवतीकडे असणारी गुहा
धान्याची कोठारं
धान्याची कोठारं
धान्याच्या कोठारांकडे जाणारा मार्ग
हडसरच्या पठारावर फुललेली रानफुलं
हडसरच्या पठारावर फुललेली रानफुलं
हडसरच्या पठारावर फुललेली रानफुलं
गेल्या दोन दिवस सह्याद्रीत घालवून परत शहराची वाट धरणं जीवावर आलं होतं. माहेराहून सासर कडे निघालेल्या एखाद्या माहेरवाशिणीच्या मनाची जी अवस्था होते तशी काहीशी अवस्था माझ्या मनाची झाली होती. पावलं निघत नव्हती पण कसेबसे मी स्वता:ला गाडीत कोंबले. या भटकंतीच्या बर्याचशा आठवणी मनात आणि काहीशा कॅमेर्यात साठवून परतीची वाट धरली.
13 comments:
1 no Amol.. parat jaun aalyasarkhe vatale.. :)
जबरदस्त...
अमोल साहेब, मान गये.
सुंदर पोस्ट. फोटो अप्रतिम आले आहेत.
आता तर तुम्हाला भेटावेच लागेल आणि सोबत एक ट्रेक करावाच लागेल.
khichadichya suvasacha photo??? laii bhari :)
- Abhijit
वसुधा
नेहमीप्रमाणेच दर्जेदार, लेखन आणि छायाचीत्रनही...
ट्रेकला न येताही, अनुभवल्यासारखे वाटले.
This was a another rocking trek...
Looking ahead to the next one..
Nice one amol ;)
good one Amol ...proud to be ur lil brother...
धन्यवाद मित्रहो !!
Bhari... once again I missed this...
Nice Collection Yaar
तुमचे ब्लॉग छान आहेत. www.globalmarathi.com वर पण पोस्ट करा आम्हाला तेथे वाचायला आवडतील
धन्यवाद प्रशांत !
माहेरहून सासरला चालल्यासारख प्रत्येक ट्रेकहुन येताना वाटत...
छान वाटत हे लेख वाचून...
मस्त फोटो आहेत
टिप्पणी पोस्ट करा